Type Here to Get Search Results !

जळगाव जिल्ह्यात "ओला दुष्काळ" जाहीर करण्याबाबत निवेदन.

 


मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा - 9273165283



निवेदन

प्रति,
मा. जिल्हाधिकारी साहेब,
 जळगाव.

विषय: जळगाव जिल्ह्यात "ओला दुष्काळ" जाहीर करण्याबाबत निवेदन.

महोदय,

नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे संपूर्ण राज्यभरात, विशेषतः जळगाव जिल्ह्यात शेतकरी व कष्टकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मका तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे.

आज शेतकऱ्यांपुढे अतोनात संकट निर्माण झाले आहे. परंतु एवढे नुकसान होऊनही शासनाने अद्यापपर्यंत "ओला दुष्काळ" जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्या अनुषंगाने आम्ही "राष्ट्रीय जनमंच पक्ष" तर्फे शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनाची मोहिम सुरू केली आहे. आणि या संदर्भात आपल्यामार्फत शासनापर्यंत मागणी पोहोचविण्याचे निवेदन करीत आहोत.

मागण्या:

1. जळगाव जिल्ह्यात तातडीने "ओला दुष्काळ" जाहीर करण्यात यावा.


2. बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी.


3. शेतकऱ्यांच्या पिकांचे योग्य पंचनामे करून त्यांना भरपाई देण्यात यावी.


4. बँकांचे थकबाकी वसुलीचे तसेच कर्जफेडीचे हप्ते तातडीने स्थगित करण्यात यावेत.


5. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, वीज व इतर सोयी उपलब्ध करून द्याव्यात.

निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास वाघ, महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप दादा लांडगे, चोपडा तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, एरंडोल तालुका अध्यक्ष महेश चौधरी, जळगाव शहराध्यक्ष प्रमोद डोंगरे, जळगाव शहर युवक आघाडी अध्यक्ष पंकज सुरवाडकर, चोपडा शहराध्यक्ष लीलाधर कोळी आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments