Type Here to Get Search Results !

जीडीपी च्या बाबतीत भारताने खरंच जपानला मागं टाकत चौथा नंबर पटकावला आहे का?

 

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 


भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी 24 मे 2025 रोजी केला.

पण दोनच दिवसांनी, सोमवारी (26 मे), नीती आयोगाचे सदस्य अरविंद विरमाणी म्हणाले की, 2025 च्या अखेरीस भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या या दाव्यांबाबत बोलताना, काही लोकांनी या दाव्यावर विश्वास ठेवला तर, तर काही अर्थतज्ज्ञांना असं वाटतं की भारताने जीडीपीबद्दल दावे करण्यात घाई केली आहे.


गेल्या एप्रिलमध्ये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्यांच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक रिपोर्टमध्ये असा अंदाज लावला होता की, 2025 पर्यंत भारत 4.187 ट्रिलियन डॉलर्ससह जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.

सुब्रमण्यम नेमकं काय म्हणाले होते?

24 मे रोजी सुब्रह्मण्यम यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितलं होतं की, "मी इथे बोलतोय त्याचवेळी आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची आहे आणि ही माझी आकडेवारी नाही. ही आयएमएफची आकडेवारी आहे. आज भारत जीडीपीच्या बाबतीत जपानपेक्षा मोठा आहे."

Post a Comment

0 Comments