Type Here to Get Search Results !

चाळीसगाव जिंगर वाडी परिसरातील पथदिवे प्रश्न तत्काळ मार्गी; समाजसेविका सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांची पुढाकाराने समस्या सोडवली

 






मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 


चाळीसगाव शहरातील जिंगर वाडी परिसरात मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अंधारामुळे महिला, वृद्ध, विद्यार्थी तसेच कामावरून परतणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

या समस्येची दखल घेत समाजसेविका, समाज रत्न पुरस्काराने सन्मानित तसेच Live नवं विचार News च्या मुख्य संपादिका सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून थेट चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाकडे अधिकृत तक्रार नोंदवली. त्यांनी केवळ तक्रार नोंदवून न थांबता, ही बाब तातडीची असून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे ठामपणे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांच्या ठाम आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे चाळीसगाव नगरपालिका विद्युत पुरवठा विभागाने या तक्रारीची तत्काळ दखल घेतली. पथदिवे बंद असलेल्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेण्यात आले. काही तासांतच संबंधित परिसरातील बहुतांश पथदिवे सुरू करण्यात आले, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या कार्यवाहीसाठी चाळीसगाव नगरपालिका विद्युत पुरवठा विभागाचे सुमित सोनवणे दादा, तसेच हर्षल पाटील आणि योगेश चव्हाण यांनी अतिशय तत्परतेने काम करून प्रशासनाची सकारात्मक भूमिका अधोरेखित केली. त्यांच्या सहकार्यामुळेच ही समस्या इतक्या लवकर मार्गी लागली, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांचे हे कार्य केवळ एक तक्रार नोंदवण्यापुरते मर्यादित न राहता, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरले आहे. पत्रकारिता आणि समाजसेवा यांची सांगड घालत त्या सातत्याने जनहिताच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होत असून, सामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय मिळत आहे.

जिंगर वाडी परिसरातील नागरिकांनी सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांचे मनःपूर्वक आभार मानत, भविष्यातही अशाच पद्धतीने सामाजिक प्रश्नांसाठी त्या पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही घटना समाजसेवक, पत्रकार आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सकारात्मक बदल घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Post a Comment

0 Comments